उचल्या

लेखक – लक्ष्मण गायकवाड

पुस्तक परिचय / समीक्षा

समीक्षक: आरव राऊत, वर्ग 10, जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती (महाराष्ट्र)

‘उचल्या’ हे पुस्तक मी जानेवारी २०२५ मध्ये ‘जूठन’ वाचण्याच्या अगोदर वाचले होते. काही मराठी दलित आत्मकथा मी ऑक्टोबर २०२४ मध्येच वाचल्या होत्या जश्या भुरा, कोल्हाट्याचं पोर, बलुतं, पण ‘उचल्या’ या  पुस्तकाचे  त्या दरम्यान माझ्याकडून वाचन झालं नाही. मी जवाहर  नवोदय विद्यालय झज्जर ला असताना तेथील माझे  मराठी चे शिक्षक विशाल सरांनी मला हे पुस्तक सुचवलं  होतं.   

उचल्या या पुस्तकाचे लेखक लक्ष्मण गायकवाड हे अतिशय बिकट परिस्थितीतून बाहेर आलेले लेखक आहे, त्यांनी या पुस्तकात त्यांच्या बालपणापासून तर त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत उभं होण्यापर्यंतचं वर्णन लिहिलेले आहे.  त्यांनी या पुस्तकाची सुरुवात त्यांच्या जातीच्या ओळखीपासून केली. ते पाथरूट जातीचे होते, त्यांच्या जातीला चोराची जात म्हणायचे. चोरी करणे हे त्यांच्या  दिनचर्ये मध्ये समाविष्ट होते. त्यांना चार भाऊ आणि दोन बहिणी  होत्या. त्यांच्या चौथ्या भावाला फेफरं यायचे व ते त्यांना खूप त्रास द्यायचे. त्यातले हे सर्वात लहान भाऊ होते. त्यांच्या बाबाला यांना शिकवायचे होते, मोठे बनवायचे होते.

त्यांचे भाऊ माणिक दादा चोरी करणाऱ्यांच्या टोळीत होते, त्यांना चोरी करणे शिकवल्या जायचे. एकदा त्यांच्या दादाला चोरी करताना पकडल्या गेले, तेव्हा त्यांना खूप बदडलं, मारलं आणि जास्त मारायच्या भीतीने त्यांनी त्यांच्या सवंगड्यांची नावे सांगितले त्यामुळे त्यांच्या सवंगड्याना खूप राग आला आणि त्यांच्या सवंगड्यानी सुद्धा त्यांना खूप बदडलं जनावराहूनही  बत्तर त्यांना मारले. असं करता करता त्यांना चोरी करण्याचा  सराव  झाला व ते हळूहळू पैसे घरी आणायला लागले त्यांनी त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या भावाला चोरी करायला शिकविले. त्यांची भाषा साध्या मराठीहून फार वेगळी आहे, त्यांच्या भाषेतले काही गोष्टी खाली आहे.

खिस्तन्ग मतने – खिसे कापणे 

मुच्चू करणे – चोरी करणे 

तिरगाया जाणे – चोरी करायला जाणे 

गुन्ना – डुक्कर 

फंदी –  डुक्करीन

आणखीन बऱ्याच गोष्टी आहे ज्या मला खूप वेगळ्या वाटल्या. त्यांच्या भाषेत बरेच तेलगू शब्द सुद्धा वापरले आहेत. 

त्यांचे घर गावाच्या हागंदारीच्या जवळ होते त्यांच्या घरापुढं  रोज गावातल्या बाया हागायला यायच्या, त्यांना सुद्धा बरे होते, गुन्ने संडास खायला यायचे व हे गुन्ने कापून आणि शिजवून खायचे. त्यांच्या घरी खाण्याचे खूप वांदे व्हायचे, पण त्यांच्या वडिलांनी त्यांचे शिक्षण थांबू नाही दिले. ते ४ थी व  ५ वी गावातल्या शाळेत शिकले मग बाहेरगावी गेले. त्यांना हॉस्टेल मध्ये पाठविले पण तिथे त्यांचं मन काही लागले नाही. मग ९ वी मध्ये त्यांनी हॉस्टेल सोडले. काही दिवसात ते नौकरी करायला लागले.त्यांचे जीवन पटरीवर आले. एका दिवशी त्यांना दिवाळीचं बोनस कमी मिळालं म्हणून त्यांनी आवाज उचलला, त्यांनी त्या मोर्च्याचं नेतृत्व केलं. त्यांच्या या कामगिरी मुळे त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून  १५ ऑगस्ट च्या दिवशी मंचावर जाण्याची व भाषण देण्याची संधी मिळाली. गायकवाड  यांनी त्या संधीचा पुरेपूर वापर घेतला आणि सगळी खरीखुरी माहिती सांगितली. जी पण मारधाड, अत्याचार , पैश्याचा घोळ होत होता ते सर्व सांगितलं. 

कामगार हे पाहून खुश झाले कारण त्यांच्या तर्फे कोणीतरी बोलून राहिलं होतं. कामगारांनी गायकवाडांना बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये निवडून दिले व त्यांनी कामगारांच्या भलाई साठी भरपूर अभियान केले. सर्व कामगार त्यांना नेता समजू लागले होते. मग मालक लोकांना गायकवाडांचा  खूप राग यायला लागला होता यामुळे त्यांना नोकरीतून हाकलण्यात आले. त्यांची नोकरी गेली म्हणून पोटापाण्याचे भरपूर समस्या होऊ लागल्या. त्यांनी भाजीपाल्याचा धंदा, चहा टपरी, हॉटेल हे सर्व धंदे त्यांनी करून पाहिले. एका दिवशी त्यांनी जातीसाठी काहीतरी करावे असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी शाळा उघडण्यासाठी वाटचाल केली पण त्याच्यात ते अयशस्वी ठरले. पण ते कोणत्याही समाज सुधारण्याच्या कार्यासाठी हजर राहायचे. त्यामुळे ते खूप ओळखल्या जायचे. त्यांना पूर्ण महाराष्ट्रात ओळखले जायचे. मग असच एका दिवशी त्याना लोकसभेच्या निवडणुकीत उभं राहण्याची संधी मिळाली व  त्यासाठी ते बरेच राबले पण पैश्याच्या कमतरते मुळे ते  निवडणूक हरले .

या पुस्तकातल्या मला काही घटना एकदम किळसवाण्या वाटल्या त्यातली पहिली घटना –  लक्ष्मण व त्यांचे चौथे भाऊ हे दोघे सोबत झोपायचे त्यांच्या घरात जागेची बरीच कमतरता होती म्हणून ते दोघे मेंढ्या बकऱ्या यांच्या बाजूलाच झोपायचे. त्यांच्या कडे एक किंवा दोनच पांघरून असायचे, म्हणून ते दोघे एकाच पांघरुणात झोपायचे. कधी कधी त्या मेंढ्या त्यांच्या पांघरुणात मुतायच्या आणि त्यांना गरम वाटायचे व मुख्य म्हणजे त्यांना ते आवडायचं. ते म्हणत होते की ह्या बकऱ्या अश्याच मुतत राहाव्या आणि आम्हाला गरम करत राहाव्या. ते   पांघरून  धुवायचे नाही. सकाळी उन्हात टाकून रात्री पुन्हा अंगावार घ्यायचे. 

दुसरी घटना मला त्याहून हि किळसवाणी वाटली – त्यांच्या जातीची जात पंचायत व्हायची. मुख्य लोकांना तळंगे असे म्हणायचे, तर एकदा एक घटना घडली एका माणसाने त्याच्या पोरीला बायकोसारखे वापरले व हे पूर्ण गावाला माहित पडले, त्या दोघांना बोलवले, जात पंचायत बसवली व सर्व तळंग्यानी आपले मतं प्रस्तुत केले व एका निश्ष्कर्षांवर पोहोचले, ते निश्ष्कर्ष वाचून माझ्या अंगावर काटे आले होते, त्या माणसाला त्याच्या पोरीच्या मुतात त्याच्या मिश्या भिजवने व त्याला दोन वर्ष वाळीत टाकने असा तो निष्कर्ष होता. 

अश्याच एका जात पंचायत च्या वादामुळे एका माणसाला बाईच्या मुतात नाक बुडवावं लागलं होतं.  अश्या काही गोष्टी माझ्यासाठी अविश्वसनीय आणि विचारांच्या पलिकडे होत्या.

हे पुस्तक विमुक्त जातीच्या लोकांचं दुःख, त्रास, यातना व पीडा सर्व सांगते. माझ्या सारख्या पोराला अश्या आत्मकथा काधीच वाचायला नाही मिळाल्या. हि आत्मकथा मी वाचली नसती तर मला या लोकांचं आयुष्य कधी कळलंच नसतं, मला माहित नसतं पडलं कि जगात हे सुद्धा कधी घडलं. 

‘उचल्या’ हे पुस्तक २१६ पानांचं आहे. या पुस्तकाचे प्रकाशक ‘साकेत प्रकाशन’ आहे, या पुस्तकाची किंमत ११० रुपये आहे. 

Published by aaravraut

मैं अमरावती (महाराष्ट्र) से आरव राउत हूं। मै शुरू से ही एक प्रिंट-समृद्ध वातावरण में बड़ा हुआ, यही कारण था कि पढ़ने और लिखने की दिशा में मेरी प्रवृत्ति विकसित हुई। मेरी मातृभाषा मराठी है। हिंदी दूसरी भाषा है, जिसे मैंने दिल्ली में सुनना और अध्ययन करना शुरू किया जब मेरे पिता महाराष्ट्र से दिल्ली स्थानांतरित हो गए, मैं उस समय केवल 6 वर्ष का था। डायरी के ये पृष्ठ इस अर्थ में बहुत खास हैं क्योंकि यह मेरे द्वारा कक्षा 2 से ही लिखें गए है। मैं एजुकेशन मिरर का सबसे छोटा लेखक हूं जो एक ऑनलाइन शिक्षा संगठन है। जब मेरी दो डायरियाँ प्रकाशित हुईं, तो मैं दूसरी कक्षा में पढ़ रहा था। मैं हिंदी, मराठी के साथ ही अंग्रेजी भाषा में भी लिखता हूं। मुझे यात्रा करना, किताबें पढ़ना और नए विचारों पर काम करना पसंद है। घर पर, मुझे हमेशा अपने मन की बात लिखने की आजादी थी, मैं कभी भी उपदेशक बातें लिखने के लिए मजबूर नहीं था। यही कारण था कि मैंने जल्द ही पढ़ना और लिखना सीख लिया। बचपन में, मैंने लेखन की तकनीकी चीजों को समझा। मुझे याद है कि जब मैं कक्षा 1 (संत मैथ्यूज पब्लिक स्कूल, पश्चिम विहार, दिल्ली) में पढ़ रहा था, तब से मैंने लिखना शुरू किया। पहली बार मैंने 5 अप्रैल 2017 को लिखा था और तब से मैंने कई विषयों पर लिखा और मैंने अपने लेखन के सभी पृष्ठों को संजोकर रखा है। मेरे लेखन की यात्रा के दौरान, मुझे कभी भी किसी भी गलती के लिए बाधित नहीं किया गया था, मेरे माता-पिता चाहते थे कि मैं किसी भी व्याकरण में फंसे बिना लिखूं। इसी बात ने मुझे लिखने के लिए प्रोत्साहित किया क्योंकि मुझे पता था कि अगर कुछ गलत हुआ तो माँ / पिता कुछ नहीं कहेंगे। मैं किसी विषय के बारे में बहुत विस्तार के साथ एक पृष्ठ या कई पृष्ठ लिखता हूं।अगर मेरे द्वारा लिखे गए विषयों को देखा जाए, तो बहुत विविधता है।cc

4 thoughts on “उचल्या

  1. Nice Aarav keep it up 🎉 your understanding, reading and writing skills is excellent Good job 🎉🎉🎉

    Like

Leave a reply to sanjanasao Cancel reply