आठवते मला ते पावसाचे दिवस

ही कविता मी चौथीत असताना, ३० जुलै २०१९ रोजी लिहिली. त्या वेळेस अमरावतीत खूप जोराचा पाऊस पडत होता. मला माणगावमध्ये घालवलेले पावसाळ्याचे दिवस आठवले. शाळेतून आईसोबत येताना उसाचा रस पिणे, खिडकीतून खेकडे दिसणे आणि पावसात छमछम खेळ खेळणे हे मला खूप आवडायचे. त्या आठवणींवरून मी ही कविता लिहिली. काही वेळा मला शब्द सुचत नव्हते, तेव्हा बाबांनी मदत केली. अशा प्रकारे ही कविता तयार झाली.

पाणी आहे आपल्यासाठी खूप

पाणी आहे आपल्यासाठी खूप
पण दिसत नाही आपल्याला त्याचे रूप
पाण्याला काही रंग नाही
जर पाणी नसत तर आपण हि नाही