तीन मुले

हे पुस्तक मी फेब्रुवारी २०२५ मध्ये वाचले होते, हे माझं नववी च्या वर्षाचं अखेरचं पुस्तक होतं. त्या काळात मी इंग्रजी मधील एनिड ब्लीटनची फेमस फाईव्ह नावाची एकवीस पुस्तकांची शृंखला वाचून राहिलो होतो. हे पुस्तक माझ्या शाळेच्या पुस्तकालया मध्ये होतं, माझ्या बऱ्याच मित्रांनी हे पुस्तक वाचले होते. सर्व म्हणत होते हे पुस्तक खूप छान आहे. मग मी सुद्धा हे पुस्तक वाचायला घेतलं. मला हे पुस्तक लवकरच संपवायचं होतं कारण आमच्या परीक्षा जवळ येऊन राहिल्या होत्या. या पुस्तकाचे लेखक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी आहे. या पुस्तकात एकंदरीत तीन मुलांची एक अत्यंत भावुक व प्रेमळ कथा आहे. अगोदर मी या गोष्टीचे वर्णन करतो व नंतर माझे या पुस्तका बद्दल मत मांडतो.

उचल्या

‘उचल्या’ हे पुस्तक मी जानेवारी २०२५ मध्ये ‘जुठण’ वाचण्याच्या अगोदर वाचले होते. काही मराठी दलित आत्मकथा मी ऑक्टोबर २०२४ मध्येच वाचल्या होत्या जश्या भुरा, कोल्हाट्याचं पोर, बलुतं, पण ‘उचल्या’ या पुस्तकाचे त्या दरम्यान माझ्याकडून वाचन झालं नाही. मी जवाहर नवोदय विद्यालय झज्जर ला असताना तेथील माझे मराठी चे शिक्षक विशाल सरांनी मला हे पुस्तक सुचवलं होतं.