हे पुस्तक वाचून मला अठरा पगड जातींबद्दल भरपूर माहित पडलं, त्यांचे राहणीमान, त्यांचे खानपान आणि त्यांची शिक्षणासाठी धडपड या सर्व बाबींचा उल्लेख लेखक लक्ष्मण माने यांच्या आत्मचरित्र ‘उपरा’ यात आहे. त्यांच्या या पुस्तकाने मला शिक्षणासाठी धडपडण्यासाठी तर प्रवृत्त केलच पण त्याच सोबत त्यांच्या ‘किटाळ’ सारखे दीर्घ लेख व त्यांच्या इतर निर्मिती वाचण्यासाठी सुद्धा प्रेरित केलं. हे पुस्तक विपरीत परिस्थितीत पिछडलेल्या मानसिकतेच्या लोकांना कसं तोंड द्यायचं आणि त्यांच्या टीकांवर मात देऊन कसं जगायचं हे सुद्धा शिकवते. हे पुस्तक वाचण्याकरिता मी सर्वांनाच सुचवतो कारण हे पुस्तक तुम्हाला निश्चितच प्रेरित करेल.